समाज सुधारक - विठ्ठल रामजी शिंदे

0

 


विठ्ठल रामजी शिंदे

 

जन्म: 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक 

मृत्यू: 2 जानेवारी 1944 

 

विठ्ठल रामजी शिंदे यांना जनतेने "महर्षी" पदवी दिली, आणि अस्पृश्यता निर्मूलन हे त्यांचे मुख्य कार्य होते, ज्याला त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडले. 1932-33 मध्ये त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक मिळाले.

 

म्हणले गेलेले गौरव:

- गं. बा. सरदार यांनी त्यांना "महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी" असे संबोधले.

- भाई माधवराव बागल यांनी त्यांना "निष्काम कर्मयोगी" म्हटले.

 

संस्थात्मक योगदान:

- 1905: मुंबईत तरुण आस्तिकांचा संघ स्थापन केला.

- 18 ऑक्टोबर 1906: मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना; पहिले अध्यक्ष - न्यायमूर्ती चंदावकर.

- 1910: जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

- द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन’ ची स्थापना.

- पंढरपूर येथे रावजी भोसले यांच्या सहकार्याने देवदासी प्रथा आणि व्यसनमुक्तीसाठी अनाथाश्रम.

- ब्राह्म समाजाच्या प्रसारासाठी ‘ब्राह्म पोस्टल मिशन’ ची स्थापना.

- 23 मार्च 1918: अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना.

- मराठा समाजातील जागृतीसाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

- 1920: पुण्यात दुष्काळग्रस्तांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

- 1937: स्त्रियांसाठी ‘अहिल्याश्रम’.

- 1923: तरुण ब्राह्म समाज संघाची स्थापना.

- 1937: बहुजन पक्षाची स्थापना.

- स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

- वृद्धांसाठी संगत सभा.

 

लेखन कार्य:

- सुबोध पत्रिका या प्रार्थना समाजाच्या नियतकालिकात लेखन.

- 1903: प्रार्थना समाजासाठी उपासना साप्ताहिकाची स्थापना.

- 1903: अ‍ॅम्स्टर्डॅम येथील जागतिक धर्म परिषदेत "हिंदुस्थानातील उदारधर्म" हा निबंध सादर.

- Theistic Directory - जागतिक उदार धर्माची माहिती देणारा धार्मिक ग्रंथ.

- Untouchable India, History Of Partha, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र.

 

वैशिष्ट्ये:

- शिमगा सणातील अनुचित प्रथांना थांबवण्यासाठी जनजागृती मोहिम.

- अस्पृश्यांसाठी ‘रूपी फंड’ ची स्थापना.

- 1904: मुंबई धर्म परिषद.

- 1905: अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योद्धाराची शपथ.

- 1918: मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य; सायाजीराव गायकवाड हे प्रमुख.

- 1924: वायकोम सत्याग्रहात सहभाग.

- 1935: बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान आणि समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

- स्त्रियांच्या प्रगतीसाठी भारतात महिला विद्यापीठे स्थापावी, अशी त्यांची इच्छा.

- शाहू महाराजांनी मराठा व्यक्तीला क्षात्र जगतगुरुपदी नेमल्याचा त्यांनी निषेध केला.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)