महादेव गोविंद रानडे
जन्म: 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक)
मृत्यू: 16 जानेवारी
1901
रानडे यांना "हिंदी
अर्थशास्त्राचे जनक" आणि "पदवीधरांचे मुकुटमणी" म्हणून ओळखले जाते.
ते अक्कलकोट राज्याचे कारभारी होते आणि 1886 मध्ये भारत सरकारच्या अर्थसमितीचे
सदस्य होणारे पहिले भारतीय ठरले. गोपाल कृष्ण गोखले यांचे ते गुरु होते, तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक मानले
जातात. समाजसुधारकांसाठी त्यांनी सर्वांगीण प्रतिमान उभे केले आणि त्यांचे विचार
आर्थिक राष्ट्रवादाशी संबंधित होते.
मुख्य कार्य आणि योगदान:
- 1887: सामाजिक परिषदेची
स्थापना.
- 1890: औद्योगिक
परिषदेची स्थापना.
- मराठी पत्रकारीतेचे जनक
मानले जातात.
संस्थात्मक योगदान:
- 1865: विधवा
विवाहोत्तेजक मंडळीला (विष्णु पंडित) सहाय्य.
- 1867: मुंबईत प्रार्थना
समाजाच्या स्थापनेत सहभाग.
- 1870: सार्वजनिक
सभेच्या स्थापनेत योगदान.
- उद्दिष्ट: समाजात विचार, संघटन, आणि कृतीची सांगड
घालण्यासाठी व्यासपीठ उभारले.
- पुण्यात वकृत्वोत्तेजक
सभा आणि नगर वाचन मंदिराची स्थापना.
- 1875: वसंत
व्याख्यानमाला, पुणे.
- 1882: हुजूरपागा शाळेची
स्थापना, पुणे.
- 31 ऑक्टोबर 1896:
डेक्कन सभा.
- 1896: हिंदू विडोज
होमची स्थापना.
- संसर्गजन्य रोगांसाठी
रुग्णालय स्थापन.
- मराठी ग्रंथोत्तेजक
मंडळी, नाशिक.
- पुना मार्कटाईल बँक, रेशीम गिरणी, लवाद कोर्ट, आणि पुणे रंगशाळेच्या स्थापनेत सहभाग.
- 1889: इंडस्ट्रियल
असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना.
लेखन कार्य:
- इंदु प्रकाश (मासिक).
- एकेश्वरनिष्ठांची
कैफियत.
- 1874: जबाबदार
राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.
- 1888: एजेस ऑन इंडियन
इकॉनॉमिक्स.
- मराठी सत्तेचा उदय.
- मराठी पत्रकारितेचा
पाया घातला.
- निबंध: प्रजावृद्धीचे
दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी
व चलन.
- तरुण शिकलेल्या लोकांची
कर्तव्य — हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
वैशिष्ट्ये:
- ग. व. जोशी यांच्या
सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
- भारतात प्रागतिक आणि
सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
- 1873: 11 वर्षाच्या
मुलीशी पुनर्विवाह केला.
- पंचहौद मिशन प्रकरणात
प्रायश्चित्त घेतले.
- संमतीवय विधेयकाला
पाठिंबा दिला.
- इंडियन नॅशनल
काँग्रेसला समर्थन.
- दारिद्र्यनिर्मूलनासाठी
औद्योगिकीकरणाचा उपाय सुचवला.
- टिळकांचे रानडे
यांच्यावर अभिप्राय: "महाराष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन
करण्याची काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली."

