इंग्रज अधिकारी सर अॅलन
ऑक्टेव्हियन ह्युम यांनी 1884 साली इंडियन
नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे झाली. नंतर ही संघटना भारतीय
राष्ट्रीय काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात
आयोजित करण्यात आले, ज्याचे अध्यक्ष
कलकत्त्याचे वकील ओमेशचंद्र बॅनर्जी होते. या अधिवेशनाला देशभरातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
महत्त्वपूर्ण काँग्रेस
अधिवेशने आणि त्यांची वैशिष्ट्ये:
- 1885 – मुंबई – अध्यक्ष:
ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
- 1886 – कलकत्ता – अध्यक्ष:
दादाभाई नौरोजी
- 1887 – मद्रास – अध्यक्ष:
बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष
- 1888 – अलाहाबाद – अध्यक्ष:
सर जॉर्ज युल – पहिले स्कॉटिश अध्यक्ष
- 1889 – मुंबई – अध्यक्ष:
सर विल्यम वेडरबर्न – पहिले इंग्रज अध्यक्ष
- 1896 – कलकत्ता – वैशिष्ट्य:
वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले
- 1905 – बनारस – अध्यक्ष:
गोपाल कृष्ण गोखले – बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ अधिवेशन
- 1906 – कलकत्ता – अध्यक्ष:
दादाभाई नौरोजी – चतु:सूत्री ठराव पास
- 1907 – सूरत – अध्यक्ष:
राशबिहारी बोस – काँग्रेसमध्ये पहिली फूट
- 1915 – मुंबई – अध्यक्ष:
लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – टिळकांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश
- 1916 – लखनौ – अध्यक्ष:
अंबिकाचरण मुजुमदार – काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार
- 1917 – कलकत्ता – अध्यक्ष:
डॉ. अॅनी बेझंट – पहिली महिला अध्यक्षा
- 1920 – कलकत्ता (विशेष)
– अध्यक्ष: लाला लजपत राय – असहकार आंदोलनाचा ठराव मांडला
- 1920 – नागपूर – अध्यक्ष:
सी. राघवाचारी – असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय
- 1922 – गया – अध्यक्ष:
चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशाचा मुद्दा
- 1924 – बेळगाव – अध्यक्ष:
महात्मा गांधी – गांधीजींचे पहिले अध्यक्षपद
- 1925 – कानपूर – अध्यक्ष:
सरोजिनी नायडू – पहिली भारतीय महिला अध्यक्षा
- 1927 – मद्रास – अध्यक्ष:
एम.ए. अंसारी – सायमन कमिशन बहिष्कार ठराव
- 1928 – कलकत्ता – अध्यक्ष:
मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता
- 1929 – लाहोर – अध्यक्ष:
पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव
- 1931 – कराची – अध्यक्ष:
सरदार पटेल – मूलभूत हक्कांचा ठराव
- 1936 – फैजपूर – अध्यक्ष:
जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
- 1938 – हरिपुरा – अध्यक्ष:
सुभाषचंद्र बोस
- 1939 – त्रिपुरा – अध्यक्ष:
सुभाषचंद्र बोस
- 1940 – रामगढ – अध्यक्ष:
मौलाना अबुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा
- 1942 – मुंबई – अध्यक्ष:
मौलाना अबुल कलाम आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा
- 1946 – मिरत – अध्यक्ष:
जे. बी. कृपालानी
- 1947 – दिल्ली – अध्यक्ष:
डॉ. राजेंद्र प्रसाद – स्वतंत्र भारतातील पहिले अधिवेशन

